शहरातील जनतेला मूलभूत सोई सुविधा देण्याबाबतही ते अपयशी ठरले आहेत. त्यांचे प्रशासनावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही त्यामुळे अधिकारी त्यांच्या मनमर्जीप्रमाणे वागत आहेत व त्याचा त्रास शहरातील जनतेला होत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी तसेच सत्ताधा-यांनीही भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. ते आरोप त्यांनी खोडून न काढता कुठल्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा आजतागायत दिलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे सिध्द होते. व त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. असे प्रथम दर्शनी दिसून येते.
त्यामुळे आयुक्त, श्रावण हर्डीकरण यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. तसेच त्यांनी पदभार घेतल्यापासून जे आर्थिक निर्णय घेतलेले आहेत, त्याबाबत सक्षम समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी केली
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.