पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत:ची उमेदवारी पार्थ पवार यांच्यासाठी मागे घेतली, असा दावा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेत केला.
पार्थ पवार यांना घाटाखालून किती मताधिक्य मिळेल, हे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही मात्र मताधिक्य नक्कीच देऊ, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
देशाच्या राज्यघटनेला वाचवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत आम्ही सामील झालो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यामागे आमची कोणतीही अट नाही, असेही पाटील यांनी पुढे स्पष्ट केले. मी मार्क्सवादी असलो तरी आंबेडकरवादी आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.
दरम्यान, मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवत असून या मतदारसंघात शेकापचा पाठिंबा पार्थ यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन तालुक्यांचा समावेश असून या भागात शेकापचं वर्चस्व राहिलेलं आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.